६/२३/२०१४

गोंधळामुळे पास देणेच बंद




रेल्वे पासवरून उडालेल्या गोंधळामुळे काही स्टेशनांवरील जनसाधारण तिकीट बुकिंग सेवा (जेटीबीएस) केंद्रांनी रविवारी पास देण्याचे कामच बंद केले होते. पाससाठी नेमकी किती रक्कम घ्यायची, याबाबत संभ्रम असल्याने सकाळपासून प्रवाशांशी वारंवार खटके उडत असल्याने ते देण्याचे बंदच केल्याचे एका क्लार्कने सांगितले.

जुन्या दराने पास काढण्यासाठी आलेल्या प्रवाशांना केवळ तीन दिवसांसाठीच सध्याच्या भाड्यानुसार पैसे द्यावे लागतील व त्यानंतर नवे दर लागतील, असे सांगितल्याने प्रवासी संतप्त झाले होते. प्रवाशांना पाससोबत तशी पावतीही दिली जात असल्याचे ठाण्यातील एका क्लार्कने सांगितले. या गोंधळाचा फटका बुकिंग क्लार्कनाही बसला. पासच्या नवीन रक्कमेचा आढावा घेण्यात त्यांचा वेळ जात होता.

कल्याण पूर्वेकडील लोकग्राम येथील बुकिंग ऑफिसमध्ये २५ जूनपर्यंत पास मिळणारच नाही, असे प्रवाशांना सांगण्यात आल्याच्या तक्रारी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या पदाधिकारी योजना अंबाडे यांच्याकडे आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search