गेल्या आठ दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने आज मुंबईत पुन्हा हजेरी लावली. आज पहाटेपासूनच मुंबईच्या दादर, माहीम, वरळी आणि लोअर परेल या भागात मुसळधार पावसाला सुरवात झाली.
गेल्या आठ दिवसापासून मुंबईतील पावसाने दडी मारली होती. मात्र आज सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबईच्या अंधेरी, विलेपार्ले, वांद्रे आदी उपनगरातही काही भागात पाऊस पडला.
मुंबईत जरी पावसाने हजेरी लावली असली तरी अर्ध्याच्यावर महाराष्ट्र कोरडाच आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे, मराठवाडा तसंच विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा मागमूसही नाही. त्यामुळे काही भागात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे.
APM Majha