लागणारे साहित्य:
एक लादी पाव ,दीड कप बारीक चिरलेला कांदा,दोन ते अडीच कप बारीक चिरलेला टोमॅटो,सहा मध्यम बटाटे,दहा ते बारा वाफवलेले फ्लॉवरचे छोटे तुकडे,अर्धा कप वाफवलेले मटार,एक कप सिमला मिरची बारीक चिरून घ्यावी,नउ ते दहा लसूण पाकळ्या किंवा लसून पेस्ट ,
एक चमचा लाल तिखट,चार चमचे तेल,अर्धा चमचा जिरे हवे असतील तर,दोन चमचे पावभाजी मसाला,आणि चवीनुसार मीठ, बटर, लिंबाचा रस, चिरलेली कोथिंबीर.
कसे तयार कराल:
आधीच चिरलेल्या आणि वाफवलेल्या भाज्या तयार ठेवाव्यात.लसूण सोलून त्यात लाल तिखट घालावे. एक मोठा चमचा पाणी घालून मिकसरवर बारीक करावे.आता कढईत तेल गरम करून त्यात जीरे घालावे, लसूण आणि लाल तिखटाची पेस्ट घालावी.लसूण परतले गेल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. मध्यम गैसवर तो शिजू द्यावा. नंतर त्यात चिरलेली सिमला मिरची घालावी.पाच मिनिटानंतर त्यात बारीक चिरलेले टोमॅटो घालावे. टोमॅटो नरम झाले की बटाटा, फ्लॉवर आणि मटार घालावे. ढवळून त्यात पावभाजी मसाला घालावा. थोडे पाणी घालावे.पावभाजी कढईच्या तळाला लागू नये म्हणून मधेमधे ढवळत राहावे. चांगले दाबून मिक्स करावे.नंतर गॅस बारीक करुन कढईवर झाकण ठेवून वाफ काढावी. चवीनुसार मीठ घालावे. वाढताना बटर घालावे. वरुन लिंबू पिळावे आणि कोथिंबीर पेरावी.
संदर्भ:Facebook share
लेखक : anonymous