तशी आपल्या आयुष्याची समीकरणे आपण साधी सोपी ठेऊ शकतो
पण काळाच्या ओघात ती आणखी किचकट होऊन जातात
कारण आपल्याला हव्या असतात 'वेगवेगळ्या पद्धती ' ती समीकरणे सोडवण्याच्या
आणखी सोपी,दुसरी एखादी,पेलवणारी वगैरे वगैरे
'दुसर्यांच्या नियमांनी ' आपण आपली समीकरणे सोडवू बघतो
कधी गृहीतके चुकतात तर कधी आकडेमोड
पण खरे दुख तेव्हा नव्याने बोचते जेव्हा जेव्हा उत्तरेच चुकतात
मग मनच आपल्याला समजावत , बाबारे तू फक्त चालत राहा ,
गंतव्य स्थानी पोहोचवलच पाहिजे असे रस्त्यावर बंधन लादलेले नाही, तसेच
समीकरण बरोबरच आले पाहिजे असे समीकरणावरही !
संदर्भ: facebook share
लेखक :anonymous