२/२६/२०१५

जाणिव झाली आहे मला


जाणिव झाली आहे मला हि आता
नाही त्या वाटांवर पुन्हां जायचं,
या मनाला आता तुझ्यामुळे
नाही पुन्हां पुन्हां दुखवायचं.

मनाने घेतलेल्या निर्णयावर
आता सतत ठाम रहायचं,
काटेरी वळणांपासून त्या
स्वत:ला नेहमी दूरच ठेवायचं.

तु दिलेल्या त्या जखमांतूनही
आता नविन काहीतरी शिकायचं,
तुझ्या त्या सर्व आठवणी विसरून
एक नविन आयुष्य उभं करायचं.
संदर्भ: facebook.com
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search