स्वप्नात प्रियासी आली होती.
जीला सारख भेटता येत नाही,
मनसोक्त बोलता येत नाही.
अशी ती स्वप्नात यावी.
मस्त स्वप्न रंगल होत तितक्यात आईने
आवाज दिला "उठ खूप उशीर झालाय "
अशा वेळी सुचलेली कविता.....
उठवू नको ना आई मला
अजुन थोडं झोपू दे
भेटायला आली सुन तुझी
जरा मनसोक्त तिला भेटू दे
वेळ नसतो कधी तिला ग
भेटत नाही बोलायला
मनातल्या गोष्टी मनातच राहतात
संधीच नसते सांगायला
भेटावे म्हटले कधी तिला तर
भेटताच सुरुवात निघायला
पाहिल कोणी म्हणून घाबरते
आता कोणीच नाही पहायला
लाजते थोडी,घाबरते ही
चार -चौघात कधी ती बोलत नाही
एकांत भेटलाय आता कुठे तर
स्वप्न आता हे तोडवत नाही
थांबना ग आई थोड,
थोड अजुन बोलू दे
इतक सुंदर स्वप्न पडलय
स्वप्नातच थोड जगू दे...!!!